।। श्री आशापुरी देव्यै नमः ।। आपल्या मूळ वृत्तीपासून ‘निवृत्ती’ घेऊन ‘ज्ञाना’च्या ‘सोपाना’ने ‘मुक्ती’ कडे केलेली वाटचाल.. वारी प्रयोजन वेढा वेढा रे पंढरी । मोर्चे लावा भीमा तीरी ।। तुम्ही पंढरीला वेढा घाला.. चंद्रभागेच्या तीरावर मोर्चेबांधणी करा.. विठ्ठलाला आत कोंडून टाका.. आणि, त्याच्याकडून प्रेमरूपी खंडणी वसूल करा.. that's one of the many possible ways of looking at it.. आवृत्त्या दिंडी स्वरूपातील वारी ची परंपरा ज्ञानेश्वर - नामदेवांच्याही अगोदरपासूनची आहे.. हिला पालखीची जोड द्यायचे श्रेय तुकाराम महाराजांचे कनिष्ठ पुत्र नारायणबाबा यांना जाते.. नारायणबाबांना स्फूर्ती झाली की आपण प्रतिवर्षी दिंडी घेऊन पंढरीची वारी करतो.. त्याला तडका लावत, ज्ञानोबा - तुकोबांच्या बरोबर का करू नये? 🤔.. हे संत जरी देहरूपाने आपल्या समवेत नसले, तरी प्रतीकात्मकरीत्या आणि नामरूपाने असू शकतात.. मग त्यांची पालखी सज्ज करून तिच्यात तुकाराम महाराजांच्या पादुकांची प्रतिष्ठापना केली.. ही पालखी मिरवीत ते आळंदीला गेले.. तेथे त्याच पालखीत ज्ञानोबारायांच्या पादुका ठेवल्या आणि तिथून निघाले / नियमित निघायला लागले एक...